रानगवा मरण्यामागे चीन-पाकिस्तान होती का?

शिवसेनेच्या मुखपत्रातून रावसाहेब दानवेंना खोचक टोला

0

मुंबई ः पुणे शहरात रानगवा दिसल्यानंतरची धावपळ आणि त्याला पकडण्यासाठी चाललेले रेस्क्यू ऑपरेशन, त्यात त्याचा झालेला मृत्यू , यावरून दै. सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर शिवसेनेने निशाणा साधलेला आहे. त्यात असं म्हटलं आहे की, ”रानगवा मेला यामध्ये महाविकास आघाडीचे अपयश आहे, असा आरोप भाजपावाले करतील. आणि त्या गव्याला मारले ते पाकिस्तान आणि चीनच्या चिथावणीमुळेच, असंही रावसाहेब दानवे म्हणतील”, असा मार्मिक टोला शिवसेनेने लगावला आहे.

अग्रलेखामध्ये पुढे असं म्हटलंय की, ”मुंबईवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या कसाबलाही फाशीच्या तख्तावर जाईपर्यंत माणुसकीने वागविले जाते. पण मनुष्याच्या जंगलात शिरलेल्या गव्याच बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन मारले जाते”, अशी खंतही शिवसेनेने व्यक्त केली आहे.

”पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीतही काही काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली, त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय?”, अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.