ग्रामपंचायत सदस्यांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार

मतमोजणीला झाली सुरुवात

0

मुंबई : राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज, सोमवारी १८ जानेवारीला सुरु झाली आहे. यामध्ये एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार असून कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८० टक्के  मतदान झाले. काही ठिकाणी तुरळक हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी राज्याच्या विविध भागांमध्ये होईल. एकू ण १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला होता. १५२३ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात २६,१७८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकू ण ४६,९२१ प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली.

निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :  ठाणे -१४३, पालघर- ३, रायगड- ७८, रत्नागिरी- ३६०, सिंधुदुर्ग- ६६, नाशिक -५६५, धुळे -१८२, जळगाव -६८७, नंदुरबार- ६४, नगर -७०५, पुणे -६४९, सोलापूर- ५९३, सातारा- ६५२, सांगली- १४२, कोल्हापूर- ३८६, औरंगाबाद- ५७९, बीड- १११, नांदेड- १०१३, परभणी- ४९८, उस्मानाबाद- ३८२, जालना- ४४६, लातूर- ३८३, हिंगोली- ४२१, अमरावती- ५३७, अकोला- २१४, यवतमाळ- ९२५, वाशीम- १५२, बुलढाणा- ४९८, नागपूर- १२७, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६०४, भंडारा- १४५, गोंदिया- १८१, गडचिरोली- १७०.

Leave A Reply

Your email address will not be published.