भीषण अपघातात पंढरपूरला निघालेल्या 4 वारकऱ्यांचा मृत्यू

0

सोलापूर : वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातात सुमारे चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 6 वारकरी जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व वारकरी हे तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील रहिवाशी आहेत. हा अपघात सोलापूर – पुणे महामार्गावरील कोंडीजवळ झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावातील 50 ते 55 वारकरी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. मात्र त्यांची ट्रॅक्टर ट्रॉली कोंडीजवळ आली असता समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू ट्रकने ट्रॉलीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ही ट्रॅक्टर ट्रॉली सुमारे 600 फूट अंतरावर फरफटत गेली.

हा अपघात एवढा भीषण होता, यामध्ये 4 वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 6 वारकरी जखमी झाले. स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बचावकार्य सुरु केले. अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात 34 ते 40 जखमींवर उपचार सुरू असून अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.