३२ किलो सोने, हिरे-मोत्यांसह ३९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता; प्राप्तिकर विभागाचा छापा

0

जालना : लाेखंडी गज उत्पादित करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरे-कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. यामध्ये ५८ काेटींची राेकड, ३२ किलाे साेन्याचे दागिने, हिरे, माेती असा १६ काेटींचा ऐवज तसेच सुमारे ३०० काेटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यात औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर व व्यापाऱ्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ही राेकड माेजण्यासाठीपथकाला तब्बल १३ तास लागले. १ ते ८ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील २६० अधिकारीनोंकर्मचारी १२० हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात पाेहोचले हाेते.

प्राप्तिकर विभागाच्या नाशिक अन्वेषण व शाेध (डिटेक्शन) विभागांतर्गत औरंगाबादच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसाार, जालना येथील चार बड्या स्टील कारखानदारांनी काेट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवसायातून मिळवत ते पूर्णपणे रेकाॅर्डवर न आणता राेखीत व्यवहार केले आहेत. यातून प्राप्तिकर बुडवल्याचा संशय हाेता. नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात १ ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांतून जाऊन स्टील कारखानदारांवरनोंव्यावसायिकांच्या कार्यालयांवर तसेच निवासस्थानी छापे टाकले. एकाच वेेळी वेगवेगळ्या पाच पथकांनी ही कारवाई केली. त्यात सुरुवातीला काहीच हाती लागले नाही. त्यामुळे या पथकांनी त्यांच्या शहराबाहेरील आठ ते दहा किलाेमीटरवरील फार्महाऊसकडे माेर्चा वळवला. तेथे कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत राेकड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली. आणखी एका व्यावसायिकाच्या घरीही अशीच रक्कम सापडली.

जालन्याच्या या चारही स्टील व्यावसायिकांपैकी तिघांकडे राेख रकमेसह साेन्याचे दागिने नों बिस्किटे, विटा, नाणी, हिरे मिळाले. सोन्याच्या ३२ किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत १६ कोटी रुपये आहे. या व्यापाऱ्यांची घरे, कार्यालयांतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगले यांसह बँकांतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. एकूण सुमारे ३०० काेटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा दावा पथकाने केला.

जालन्यात मिळालेली राेकड स्थानिक स्टेट बँकेत नेऊन माेजण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली माेजणी रात्री १ वाजेपर्यंत पूर्ण झाली. त्यासाठी १० ते १२ यंत्रे लागली. ३५ कापडी पिशव्यांत नाेटांची बंडले पॅक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.