नाशिक : नाशकातील स्वाभिमानी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांची होळी केली आहे. केंद्र सरकारने केलेले कायदे मोठमोठ्या उद्योपतींच्या घशात घालणारे आहे. हे कायदे शेतकऱ्यांवर वाऱ्यावर सोडणारे असणारे असल्याने रद्द झाले पाहिजेत, अशी मागणी नाशिकमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे
मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.