मुंबई : राज्यभरात पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. या अर्जाची पडताळणी आणि चर्चा केल्यानंतर विनंती अर्ज आस्थापना विभागाचे विशेष महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी अमान्य केले आहेत.
विहित कालावधी पूर्ण न झालेल्या नि:शस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या प्रमुखांकडून शिफारशीसह विनंती अर्ज पोलीस आस्थापना मंडळासमोर 29 ऑक्टोबर 2020 रोजी सादर करण्यात आले होते.
ज्या घटकांमध्ये बदली करण्यात आली, तेथील रिक्तपदांची स्थिती, ज्या कारणास्तव बदलीची विनंती करण्यात आली, त्या कारणांचे गांभीर्य व तातडीची निकड, आतापर्यंत पूर्ण केलेला कार्यकाळ आदी बाबींचा विचार करुन विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या अमान्य केल्या आहेत.