आत्महत्या करण्यापूर्वी संदीपने फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्यात त्याने म्हटले आहे की, मी आयुष्यात खूप सुख-दुख पाहिले. समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा धीराने सामना केला. मात्र, सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे ते मला आता सहन होत नाही.आत्महत्या करणे योग्य नाही, हे मलाही ठाऊक आहे. पण माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिच्या वडिलांनी मला कधीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मला जगायचे होते. परंतु, जिथे सेल्फ रेस्पेक्ट नाही, तिथे जगून काय फायदा आहे. माझी पत्नी खूप रागिष्ट असून तिच्या आणि माझ्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक आहे. दररोज क्लेश सहन करण्याची शक्ती आता माझ्यात नसल्याचे संदीपने पोस्टमध्ये म्हटले आहे.
मी खूप आधीच आत्महत्या केली असती, पण मी स्वत:ला वेळ देण्याचे ठरवले. सर्वकाही ठिक होईल, स्वतःला प्रोत्साहीत केले. पण दररोज क्लेश, त्यामध्ये मी अडकलो आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. आता मला हे पाऊल आनंदाने उचलावे लागत असल्याचे म्हणत संदीपने आत्महत्या केली आहे.