राजू शेट्टी यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही : दरेकर

0

कोल्हापूर : राजू शेट्टी हे अजूनही स्वत:ला शेतकरी नेते समजतात. हे खूळ त्यांच्या डोक्यात आहे. सत्य स्वीकारण्याचे धाडस राजू शेट्टी यांच्यात नाही. राजू शेट्टी यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. शेट्टी यांचे लक्ष्य आता केवळ विधानपरिषदेतील आमदारकी हेच आहे. यासाठी आता राजू शेट्टी काय करतात, हे पाहावे लागेल, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

गुरुवारी इचलकरंजीत शेट्टी हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या राजू शेट्टी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राजू शेट्टी कोणत्या जगात वावरत आहेत? शेट्टी यांचा बालेकिल्ला कधीच उद्ध्वस्त झाला आहे. या किल्ल्याचे बुरुज, चिरे आणि वीटा विखुरल्यामुळे त्याची डागडुजी करण्याची गरज असल्याचे दरेकर यांनी म्हटले.

आम्ही विरोधात आहोत तर सत्ताधारी आमचे कौतुक थोडी करणार आहेत? सरकारला भाजपची भीती वाटते. भाजपवर टीका केल्याशिवाय सरकार चालवता येणार नाही. आमच्यावर टीका केली नाही तर सरकारकडे सांगण्यासारखे काय आहे, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.