महामार्ग टोलनाक्यांपासून मुक्त होणार!

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

0

नवी दिल्ली ः “पुढील दोन वर्षात टोलनाक्यापासून मुक्तता होईल. कारण, महामार्गावर कोणताही टोलनाका असणार नाही. तसेच वाहनांना पैसे भरण्यासाठी थांबविण्याची गरज नाही किंवा वाहनाची गती कमी करण्याची गरज नाही”, ही मोठी घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

अॅसोचॅम काॅन्फरन्समध्ये ते बोलत होते. यावेळी गडकरींना माहिती दिली. मंत्रालय सध्या जीपीएस यंत्रणेच्या मदतीने टोल वसूल करण्याच्या करण्याच्या प्रयत्नात आहेत. सर्व नवी वाहनं जीपीएस सिस्टनशी जोडले जातील. याद्वारे टोल वसूल केला जाणार आहे. ही जीपीएस यंत्रणा या वाहनांनी किती अंतर पार केलं, याचं मोजमाप करून टोलची वसूली करेल.

सध्या फास्टटॅगमुळे टोलनाक्यावरील वाहनांचा वेग कमी आला आहे. तसेच वाहन थांबण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. चालू आर्थिक वर्षांत राष्ट्रीय महामार्गावरील वसूल होणाऱ्या टोलची रक्कम ३४ हजार कोटी इतकी असेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. गतवर्षी ही रक्कम २४ हजार कोटी इतकी होती.

Leave A Reply

Your email address will not be published.