पवारांनी शब्द फिरवला; ठाकरेंनी भूमिका बदलली : राधाकृष्ण विखे पाटील

0

मुंबई : शरद पवारांनी भाकरी नव्हे, तर सवयीप्रमाणे शब्द फिरवला आहे. तर ठाकरेंनी भूमिका बदलली आहे, अशी खोचक टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. त्याच्या हस्ते अहमदनगरमध्ये सरकारी वाळू ठेक्याचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. त्यावर भाजपमधून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, खरे तर शरद पवार यांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. मात्र, स्वतः शरद पवारांनी भाकरी फिरवली पाहिजे, असे म्हटले होते. पण त्यांनी भाकरी फिरवण्याऐवजी सवयीप्रमाणे आपला शब्द फिरवला, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.

आज उद्धव ठाकरे यांनी बारसू, सालेगावला भेट दिली. यावरही विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरेंची नाणारवेळी वेगळी आणि आता वेगळी भूमिका आहे. ते नेहमी भूमिका बदलतात. मात्र, सरकारची स्थानिकांशी चर्चा सुरू आहे. तर ठाकरे बारसू प्रकल्पाला काहीही कारण नसताना राजकीय हवा देत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.