राजकारण : आम्हाला वाटते तो पर्यंत आम्ही महाविकास आघाडीत राहू : संजय राऊत

0

मुंबई : जोपर्यंत आपली इच्छा असेल, तोपर्यंत आपण महाविकास आघाडीत राहू, राजकारणात काहीही होऊ शकते असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटाने शिबिराचे आयोजन केले आहे. वरळीतील एनएससीआय या ठिकाणी आयोजत शिबीरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

जोपर्यंत आपली इच्छा असेल, तोपर्यंत आपण महाविकास आघाडीत राहू, राजकारणात काहीही होऊ शकते असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटाने शिबिराचे आयोजन केले आहे. वरळीतील एनएससीआय या ठिकाणी आयोजत शिबीरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

बिपरजॉय चक्रीवादळ मोदींना प्रकल्प वाटला. म्हणून त्यांनी ते मुंबई तून गुजरात कडे वळवले. अशी टीका करत खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातून मोठे उद्योग गुजरामध्ये पळवले जात असल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर, महाराष्ट्रातून क्रिकेटचे मोठे सामने देखील गुजरातला पळवले जात असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फाशीची शिक्षा दिली आहे. मात्र, फाशी देण्यासाठी आता त्यांना जल्लादाकडे प्रकरण पाठवले आहे. आता सरकारची बॉडी विधान सभेमध्ये आलेली आहे. लवकरच आपण त्यांना श्रद्धांजली वाहणार असून नवीन सरकार स्थापन करणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.

आम्ही स्वबळावर विधानसभेवर भगवा फडकवणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. आम्ही स्वभावावर सत्ता आणणार आहोत. हा आमचा पक्ष आहे आणि आमची तशी इच्छा आहे. ही अतिरेकी इच्छा नाही. ज्याचे घर फोडले, ज्यांचे जळते त्यांनाच कळते. आम्ही बोलतो, कारण आमचे जळाले आहे, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.