जबरदस्तीने दुकाने बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा ः आदित्यानाथ

0

नवी दिल्ली ः भारत बंदच्या पार्श्वभूमिवर योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला कडक आदेश दिले आहेत की,”कसल्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याकडे खासकरून लक्ष द्यावे. बंदच्या नावाखाली जबरदस्तीने कुणी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला तर, कठोर कारवाई करा”, आदेशच योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये काढलेला आहे.

व्हिडीओ काॅन्फरंसच्या माध्यमातून बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थिती चिघळलीच तर, कसे नियंत्रण मिळवावे, याचेही मार्गदर्शन करण्यात आले. गाड्यांमधून प्रवास करणारे गोंधळ निर्माण करू शकतात, अशी शंकाही योगी आदित्यनाथ यांनी बैठकीत बोलून दाखविली.

मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.