पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; तीन जागीच ठार तर 7 जण जखमी

0

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडजवळ झालेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 7 जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत अटके टप्प्याजवळ झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावर कोल्हापूरहून पुण्याकडे इनोव्हा कार व स्वीफ्ट कार निघाल्या होत्या. दोन्ही गाड्या कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही गाड्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळल्या. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने कराड येथील रुग्णालयात पाठवले. अपघात स्थळी दोन्ही गाड्यांच्या काचांचा खच पडला आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील जखमी पुणे व पुणे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.