कासारसाई धरणात बुडून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू

0

पिंपरी : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या दोन तरुणांचा कासारसाई धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 3) घडली.

शशांक सिंह (19), रवीकुमार विनोदकुमार (19, दोघे रा. आकुर्डी. मूळ रा. बिहार) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशांक आणि रवीकुमार हे त्यांच्या चार मित्रांसोबत गुरुवारी कासारसाई धरण परिसरातफिरण्यासाठी आले होते. धरणाच्या कडेला उभे असताना त्यातील तिघेजण पाय घसरून पाण्यात पडले. त्यातील एकाला मित्रांनी बाहेरकाढले, मात्र शशांक आणि रवीकुमार हे दोघे पाण्यात बुडाले.

 

दरम्यान या दोघांचे मृतदेह पोलिसांनी पाण्याबाहेर काढले आहेत. शशांकआणि रविकुमार हे दोघेही आकुर्डी येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेतहोते.

Leave A Reply

Your email address will not be published.